Showing posts with label sheti. Show all posts
Showing posts with label sheti. Show all posts

Tuesday, June 19, 2012

आवळा, चिकू लागवड कशी करावी

आवळा लागवडीसाठी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. लागवडीसाठी कृष्णा, कांचन, चकय्या, नीलम या जातींची निवड करावी. लागवडीसाठी एप्रिल महिन्यात 7 x 7 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर अंतराचे खड्डे करून 20 किलो शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि शिफारशीत कीडनाशक भुकटी आणि मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कलमांची लागवड करावी. लागवड करताना एकाच जातीची कलमे न लावता दोन ते तीन जातींची निवड करावी. त्यामुळे फळधारणा वाढण्यास मदत होते. 
चिकू लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीसाठी खिरणीचा खुंट वापरून तयार केलेले कलम निवडावे. लागवडीसाठी 10 X 10 मीटर अंतरावर 1 X 1 X 1 मीटर अंतरावर खड्डे खणून त्यामध्ये माती, तीन घमेली शेणखत, दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 100 ग्रॅम कार्बारिल भुकटी यांच्या मिश्रणाने भरावेत. लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेटबॉल जातींची निवड करवी.


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

मत्स्यशेतीसाठी कोणत्या जाती निवडाव्यात

मत्स्यशेतीसाठी लागणारे मत्स्यबीज विविध जातींचे म्हणजेच कटला, रोहू, मृगल हे भारतीय प्रमुख कार्प असून, चंदेरा, गवत्या, सायप्रिनस या चिनी माशांचा वापर करतात. मत्स्यबीज संचयनाचे प्रमाण 5000 ते 10,000 नग प्रति हेक्‍टरी एवढे असावे. या मत्स्यबीजांचा आकार कमीत कमी दोन इंचापेक्षा लांब असला पाहिजे. मत्स्यबीज शक्‍यतोवर नजीकच्या केंद्रावरून आणावे म्हणजे त्यांची मरतुक होणार नाही. 

मत्स्यबीज घेताना ते चांगल्या प्रतीचे व योग्य प्रमाणात आहेत याची खात्री करून घ्यावी. यावरच मत्स्यशेतीचे उत्पादन अवलंबून असते. लांबच्या ठिकाणावरून मत्स्यबीज आणावयाचे असल्यास ते ऑक्‍सिजन पॅक केलेल्या डब्यामध्ये आणावेत; मत्स्यबीजांची वाहतूक आणि संचयन थंड वेळेस करणे केव्हाही चांगले असते. मत्स्यबीज तलावापर्यंत आणल्यानंतर त्या प्लॅस्टिक पिशव्या तलावांमधील पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटे तरंगत ठेवावे. त्यानंतर तलावातील थोडे पाणी पिशवीमध्ये घेऊन नंतर हळुवारपणे मत्स्यबीज तलावात सोडावे. अशा पद्धतीने मत्स्यशेतीची पूर्वतयारी केल्यास निश्‍चितच फायदेशीर ठरते. 

माशांचे प्रमुख खाद्य प्लवंग असून, प्लवंग वाढीकरिता तलावामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर करतात. सेंद्रिय खतामध्ये प्रामुख्याने शेणखत, पोल्ट्रीखत व गांडूळखत यांचा वापर करतात. प्रति हेक्‍टरी शेणखताची मात्रा 10,000 किलो एवढी वापरावी. ही मात्रा सुरवातीला 2000 किलो प्रति हेक्‍टरी द्यावी. त्यानंतर उर्वरित टप्प्याटप्प्याने वर्षभरात दिली जाते. यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची मात्रा 300 किलो प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी. ही सर्व खते तलावामध्ये टाकण्यापूर्वी चुन्याची मात्रा 250 किलो प्रति हेक्‍टरी एवढी द्यावी. त्यामुळे तलावाच्या गाळामधील जीवजंतूंचा नायनाट होतो आणि पाण्याचा सामू स्थिर राहण्यास मदत होते. 
तलावामध्ये पाणी कमीत कमी पाच ते सहा फूट एवढे असावे. एक आठवड्यानंतर पाण्याचा रंग फिकट हिरवा होण्यास होण्यास सुरवात होते. याचाच अर्थ तलावामध्ये प्लवंगनिर्मिती सुरू झाली आहे. म्हणजेच माशांना आवश्‍यक असलेले नैसर्गिक खाद्य (वनस्पती व प्राणी प्लवंग) उपलब्ध आहेत. आता आपल्याला तलावामध्ये मत्स्यबीज संचयन करता येते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

शेळ्यांसाठी गोठा

बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून करता येते. गोठा बांधताना शक्‍यतो गोठ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम ठेवावी, जेणेकरून अति ऊन, पाऊस आणि वारा यांच्यापासून शेळ्यांचे संरक्षण होईल. गोठ्याच्या जमिनीवर शक्‍यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते व करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब; तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारता येते. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करता येतात. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण / आच्छादन बसवल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. एकेरी गोठ्यासाठी पूर्व व पश्‍चिमेकडून पत्र्यापर्यंत भिंतीचे बांधकाम व मोकळ्या पटांगणाच्या विरुद्ध बाजूकडून तीन ते चार फूट भिंत व त्यावर छतापर्यंत चेनलिंक जाळी बसवावी, तर मोकळ्या पटांगणाकडून जमिनीपासून चेनलिंक जाळी व त्याचेच दार बसवावे. दुहेरी गोठ्यासाठी (100 पेक्षा जास्त शेळ्यांसाठी) पूर्व-पश्‍चिम छतापर्यंत भिंती, त्यामध्ये लाकडाचे दार व दोन्ही बाजूंस आवार करून चेनलिंक जाळीचे कुंपण घालावे. छताला सिमेंटचे पत्रे लोखंडी अँगलचा वापर करून बसवावे. सिमेंटच्या अर्ध्या पाइपाच्या साह्याने एकेरी गोठ्यात पूर्व-पश्‍चिम लांबी असलेल्या भिंतीच्या बाजूने, तर दुहेरी गोठ्यात मधल्या जागेच्या दोन्ही बाजूंस जाळीच्या बाहेर जमिनीपासून साधारण एक ते दीड फूट उंचीवर गव्हाण बसवावी. या गव्हाणीची रुंदी एक फूट, साधारण तेवढीच खोली असावी. गव्हाणीच्या बाजूची जाळी ही लोखंडी पट्ट्यांच्या साह्याने मोठे कप्पे असलेली करावी, जेणेकरून शेळ्यांना त्या कप्प्यातून चारा खाणे शक्‍य होईल. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी.


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

मसाला पिकांची लागवडसाठी कोणत्या पिकांची लागवड करावी

कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ - मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्याची लागवड 7.5 x 7.5 मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लागवड करावी. नारळ, जायफळ यांच्या लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे, तर दालचिनी आणि काळी मिरी लागवडीसाठी 0.60 x 0.60 x 0.60 मीटर व 0.30 x 0.30 x 0.30 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यांच्या तळाशी वाळवी व हुमणी प्रतिबंधक कीटकनाशके वापरावीत. खड्ड्याच्या तळाशी कुजलेला पालापाचोळा अथवा गिरिपुष्पाचा पाला, दोन ते तीन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि शिफारशीनुसार सिंगल सुपर फॉस्फेट आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डा भरताना माती जमिनीच्या पृष्ठभागाच्या थोडी वर ठेवावी, जेणेकरून पाणी झाडाच्या बुंध्याशी साठणार नाही. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यांवर किंवा मध्यभागी खुणेसाठी खुंट ठेवावे. 

नारळ व मसाल्याची पिके एकाच वेळी लावता येणार नाहीत. पहिल्या वर्षी विद्यापीठाने शिफारस केलेल्या प्रताप, टी x डी यांसारख्या नारळ जातींच्या जोमदार रोपांची निवड करून जून किंवा जुलैमध्ये लागवड करावी. त्याचबरोबर दालचिनीची लागवडही करावी. पहिली दोन वर्षे दालचिनीला सावली करावी. पाचव्या वर्षी जायफळ लागवड करावी. जायफळाला पहिली तीन वर्षे सावली करावी. त्याचप्रमाणे ऑक्‍टोबर व पहिल्या उन्हाळ्यात नारळाच्या झाडासही सावली करावी. बागेमध्ये सुरवातीच्या काळात केळी किंवा पपईची मिश्र पीक म्हणून लागवड केल्यास मसाला पिकांना सावली तर मिळतेच, शिवाय केळी, पपईच्या उत्पादनामधून बागेच्या व्यवस्थापनावर होणारा खर्चही काही प्रमाणात भागविता येतो. मिश्र पीक म्हणून सुरवातीच्या काळात अननसाचीही लागवड करणे शक्‍य आहे. सातव्या वर्षी नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ मिरीच्या वेलांची लागवड करावी. तिसऱ्या वर्षाच्या सुरवातीला प्रथमतः दालचिनीच्या झाडांपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल. जायफळाचे झाड जरी तिसऱ्या वर्षी फुलोऱ्यावर येत असले, तरी उत्पादन हे अतिशय मर्यादित असते. सर्वसाधारणतः पाचव्या वर्षापासून नारळ (टी x डी) आणि दालचिनी यांचे उत्पन्न मिळू शकते. जायफळाची लागवड पाचव्या वर्षी असल्याने जायफळाचे उत्पन्न आठव्या वर्षापासून मिळू लागते, तसेच मिरीचे वेल सातव्या वर्षी लावल्यामुळे त्याच्या वेलीचा विस्तार झाल्यावर किफायतशीर उत्पादन मात्र लागवडीपासून तिसऱ्या वर्षी मिळते. 

बागेतील सर्व झाडे ही निरोगी आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी योग्य खतांच्या मात्रा, पाणीपुरवठा, तसेच पीक संरक्षण या तीन मूलभूत बाबी आहेत. त्यापैकी झाडास लागणारी मूलद्रव्ये एकाच माध्यमातून न देता ती रासायनिक, तसेच सेंद्रिय खतांच्या माध्यमातून द्यावीत. लाखी बागेसाठी मूलभूत अन्नद्रव्ये योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देणे आवश्‍यक आहे. कोकणातील जमिनीचा प्रकार व त्यांची अल्प जलधारणशक्ती पाहता बागेतील झाडांना आवश्‍यकतेनुसार दररोज सूक्ष्म अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

कांदा बीजोत्पादनाबाबत माहिती

ऑक्‍टोबर महिन्यात चाळीतील कांदे निवडून बीजोत्पादनासाठी वापरता येतात. कारण या कांद्यांना पाच ते सहा महिने विश्रांती मिळालेली असते, त्यामुळे फुलांचे दांडे मोठ्या प्रमाणात निघतात. कांदा पीक बीजोत्पादनाच्या दृष्टीने तापमानास अत्यंत संवेदनशील आहे. कंद लावल्यापासून ते फुलांचे दांडे निघेपर्यंत थंड हवामान हवे असते. मधमाश्‍यांचा वापर केल्यास पराग सिंचन चांगले होऊन बीजोत्पादन चांगले होते. पराग सिंचन चांगले झाले, तापमान चांगले राहिले, खते व पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले, तर बियांचे चांगले उत्पादन मिळू शकते. 

फलधारणा ते बी तयार होण्याचा काळ एक ते दीड महिन्याचा असतो. या काळात रात्रीचे तापमान 15 ते 20 अंश व दिवसाचे तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर राहिल्यास वाढ चांगली होते व बी लवकर तयार होते. पाणी नियोजन करताना जमिनीचा मगदूर व पिकाची वाढीची अवस्था यानुसार पाणी द्यावे. कांदा बीजोत्पादन साधारणपणे मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्यामुळे दोन पाळ्यांत आठ ते दहा दिवसांचे अंतर ठेवावे. प्रत्येक पाळीत नेहमी हलके पाणी द्यावे. कांदा पिकाची मुळे 15 ते 20 सें.मी. खोलीवर जातात. तेवढाच भाग ओला राहील इतकेच पाणी देणे गरजेचे असते. पाणी जास्त झाले, तर कंद सडतात व नांगे पडतात. म्हणून हलक्‍या जमिनीत पाणी सहा ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात थंडी असल्यामुळे पाण्याची गरज कमी असते. या काळात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावे. फेब्रुवारी-मार्च या काळात फुलांचे दांडे निघून फलधारणा होते. या काळात पाण्याचा अजिबात ताण पडू देऊ नये, म्हणून पाणी सात ते आठ दिवसांनी द्यावे. एप्रिल महिन्यात फलधारणा होऊन बी पक्व होते. ठिबक सिंचन केल्यास बीजोत्पादन चांगल्या प्रकारे घेता येते. कांदा बीजोत्पादन पिकात वाळलेले गवत, गव्हाचा कोंडा किंवा भाताचे तूस याचे आच्छादन केले, तर पाण्याची बचत होते व तणांचा उपद्रव कमी होतो. याशिवाय पाण्यातून विद्राव्य खते देण्याची सोय असल्यामुळे खतांचीदेखील बचत होते. कांदे लावल्यानंतर साधारणपणे 45 दिवसांनी खुरपणी करावी. अधिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. 

जातींची शुद्धता राखण्यासाठी विलगीकरण -
कांदा पिकात परपरागीभवन होऊन फलधारणा होते. दोन जाती बीजोत्पादनासाठी दीड कि.मी.च्या आत लावल्या किंवा रब्बी कांदा पिकात डेंगळे आले, तर परपरागीभवन होऊन जातींची शुद्धता राहत नाही. तेव्हा, जातींची शुद्धता राखण्यासाठी दोन जातींमध्ये बीजोत्पादन करते वेळी कमीत कमी दीड कि.मी. विलगीकरण अंतर राखणे अत्यंत आवश्‍यक आहे. याशिवाय बीजोत्पादनाच्या शेजारी कांदा लागवड केली असेल आणि त्यात डेंगळे आले असतील, तर फुले उमलण्याअगोदर डेंगळे तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, अन्यथा आपल्या चांगल्या जातीमध्ये डेंगळे येण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते.


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

ढोबळी मिरचीचे अळीपासून संरक्षण

स्पोडोप्टेरा या किडीचा जीवनक्रम अभ्यासल्यास अंडी अवस्था दोन ते तीन दिवस, अळी अवस्था 20 ते 22 दिवस, कोषावस्था आठ ते दहा दिवस, प्रौढ अवस्था सात ते आठ दिवस अशा प्रकारचा असतो. एक प्रौढ मादी तीन ते चार पुंजक्‍यांत 2100 अंडी एकावेळी घालते. यावरून अंड्यापासून किती मोठ्या प्रमाणात अळ्या तयार होतात, हे ध्यानात घेणे महत्त्वाचे आहे. अळी पाने खाते, प्रादुर्भाव वाढू दिल्यास सर्वच झाडांची पाने खाते. फळे लागल्यानंतर फळे पोखरते. अशा अळीपासून पिकाचे वेळीच संरक्षण करावे, हीच अळी टोमॅटो, बटाटा पिकासही प्रादुर्भाव करते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

गाभण म्हशीचे व गाईचे संगोपन महत्त्वाचे

गर्भावस्थेत गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता त्याचबरोबर गर्भाची वाढ चांगली होण्याकरिता जनावरास पोषक व पचनास सुलभ असणारे अन्न देणे चांगले असते. सर्वसाधारणपणे म्हशीचा गाभणकाळ दहा महिने, दहा दिवस, तर गाईचा गाभणकाळ नऊ महिने, नऊ दिवस असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा. त्यात प्रथिने पिष्टमय पदार्थ, खनिज क्षार, जीवनसत्त्वे हे सर्व घटक योग्य प्रमाणात असले पाहिजेत. गर्भावस्थेचे अंतिम काळात अशा गाभण जनावरांना पोषणाकरिता एक किलो जादा पशुखाद्य खुराक म्हणजे दररोज दोन किलो खुराक देणे आवश्‍यक असते. त्यामुळे गर्भाची वाढ चांगली होते. 

http://www.agriplaza.in/agri-guide.htm

क्षारपड जमिनीचे व्यवस्थापन महत्त्वाचे

क्षारपड जमिनीची खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. नांगरणीसाठी सबसॉयलर अवजाराचा उपयोग करावा. सबसॉयलर हा एक प्रकारचा खोलवर नांगरट करणारा नांगरच असतो. जमिनीतील कडक पापुद्रे या नांगराने ढिले होतात आणि पाण्याचा निचरा होण्यास जागा मोकळी होते. गहू, ज्वारी, सोयाबीन, हिरवळीची पिके घेणे फायद्याचे असते. अशा जमिनींना सेंद्रिय खतांचा अधिक वापर केल्यास जमिनी भुसभुशीत राहतात. जमिनीची तपासणी करून जमिनीचा सामू, विद्युतवाहकता, विनिमययुक्त सोडिअमचे प्रमाण किती आहे ते तपासणे गरजेचे असते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

रब्बी हंगामातील गहू-हरभरा पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

रब्बी हंगामातील गहू-हरभरा या पिकांना पिकांचे वाढीचे अवस्थेनुसार पाणी देणे महत्त्वाचे असते. गव्हाच्या वाढीच्या अवस्था पेरणीनंतर प्रत्येक 21 दिवसांनी बदलतात. मुकुटमुळे फुटणे, फुटवा, कांड्या फुटणे, फुलोरा, वाढीची अवस्था आणि दाणे भरणे या पाच अवस्था महत्त्वाच्या आहेत. तर हरभऱ्याच्या बाबतीत फुलोरा आणि दाणे भरणे या अवस्था महत्त्वाच्या आहेत. वाढीच्या अवस्थेनुसार पाणी दिल्यास उत्पादन आणि उत्पादकता अधिक येते. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात

भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो. 

सुंठ तयार करण्याच्या पद्धती ः 
1) मलबार पद्धती ः या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्‍यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते. 

2) सोडा व खास मिश्रण पद्धती ः या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 

25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

शेळीपालनाबाबत माहिती

दूध आणि मांस उत्पादनाच्यादृष्टीने संगमनेरी शेळी तर मांस उत्पादनासाठी उस्मानाबादी शेळ्या निवडाव्यात. या शेळ्यांचे पाय सरळ, मजबूत व दोन पायांत भरपूर अंतर असावे. पाठ सरळ व रुंद असावी, छाती भरदार व रुंद असावी. पैदाशीचा बोकड निवडताना उत्तम शारीरिक क्षमता असलेला, मजबूत पाय, लयबद्ध चाल, चपळ असणारा व चांगली वंशावळ असणारा बोकड निवडावा. वंशावळीची नोंद असल्यास दूध उत्पादनासाठी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या शेळ्यांपासून जन्मलेल्या पाटींची निवड करावी, तर मांसोत्पादनासाठी जुळे वा तिळे करडे देणाऱ्या शेळ्यांपासून तयार झालेले बोकड व शेळ्या निवडाव्यात. 
बंदिस्त शेळीपालन करताना शेळ्यांची संख्या हळूहळू वाढवावी, त्याप्रमाणे विस्ताराच्या दृष्टीने गोठा बांधताना जागेची सोय ठेवावी. गोठा बांधणी ही शेतातील उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून करता येते. गोठ्याच्या जमिनीवर शक्‍यतो माती, मुरूम, लाकडाचा भुस्सा, विटा यांच्या साह्याने चांगले दाबून धुम्मस तयार करावे. अशी जमीन हिवाळ्यात उबदार राहते. करडांचे व शेळ्यांचे थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होते. शेतातील बाभळीच्या झाडांपासून खांब, तर तुराट्या, भाताचा पेंढा, गव्हाच्या पेंढ्या, तसेच बाजरीचे सरमाड यांचा वापर करून गोठ्याचे छत शाकारावे. कुंपण तसेच गोठ्यातील कप्पे, भिंती, तुराट्या, बांबूच्या पट्ट्यांचा वापर करून तयार करावे. गोठ्याचे छत हे नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंचीवर शाकारावे, जेणेकरून हवा खेळती राहील, तसेच दुर्गंधी राहणार नाही. गोठ्याच्या छताला प्लॅस्टिक, पॉलिथिन अथवा खताच्या रिकाम्या पिशव्या शिवून केलेले आवरण, आच्छादन बसविल्यास पावसापासून जास्त संरक्षण मिळते. थंडीच्या दिवसांत गोणपाटाच्या साह्याने शेळ्यांसाठी, मुख्यत्वेकरून करडांसाठी ऊब राखता येते. पिण्याच्या पाण्यासाठी सिमेंटची एक टाकी गोठ्याबाहेर एका कोपऱ्यात ठेवावी. शेळ्यांचा गोठा नेहमी कोरडा राहील याची काळजी घ्यावी. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण करून घ्यावे. 


http://www.agriplaza.in/agri-guide.htm

मोसंबी लागवडीविषयी माहिती

चोपण, क्षारपड जमिनीवर मोसंबीची लागवड टाळावी. मोसंबीसाठी मध्यम जमीन एक मीटर खोल काळी माती व त्याखाली नरम मुरूम असलेली जमीन लागवडीसाठी चांगली असते. जास्त चोपण, पाण्याचा निचरा न होणारी, जमिनीतील मुक्त चुनखडीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असलेली जमिनीत लागवड करू नये. लागवडीसाठी न्यूसेलर, काटोल गोल्ड, फुले मोसंबी या जातींची निवड करावी. मोसंबीची लागवड 6 × 6 मीटरवर करावी. लागवडीसाठी 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. खड्डे खोदताना खड्ड्यातील वरील चांगली माती वेगळी टाकावी. खड्डे उन्हाळ्यात 15 ते 20 दिवस चांगले तापवून द्यावेत. खड्डे खोदताना, भरताना तळाशी शिफारशीत कीडनाशक, पालापाचोळा किंवा वाळलेला काडीकचरा यांच्या मिश्रणाचा 15 सें.मी. थर भरावा. त्यानंतर खड्डा भरण्यासाठी दोन टोपली शेणखत, खड्ड्यातून काढलेल्या वरच्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरावा. पाऊस पडल्यानंतर कलमांची लागवड करावी. कलमाचा जोड जमिनीपासून 20 ते 25 सें.मी. उंचीवर राहील याची काळजी घ्यावी. कलमे खात्रीच्या रोपवाटिकेतूनच घ्यावी. रंगपूर लाइम खुंटावरील कलमांना प्राधान्य द्यावे. कलमांचा डोळा 22 ते 25 सें.मी.वर बांधलेला असावा. 
http://www.agriplaza.in/agri-guide.htm

डाळिंब लागवडीविषयी माहिती

डाळिंब हलक्‍या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत अत्यंत चांगल्याप्रमाणे घेता येते. हलक्‍या व मध्यम जमिनीत जमिनीच्या मगदुराचा विचार करून 4.5 x 3.0 मीटर अंतरावर 60 सेंटिमीटर लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे उन्हाळ्यात खणून ते पावसाळ्यापूर्वी खत, माती मिश्रणाने भरून घ्यावेत. लागवडीसाठी गणेश, जी- 137, मृदुला, फुले आरक्ता, भगवा या जातींची निवड करावी. डाळिंबाच्या झाडास अनेक फुटवे येतात. यापैकी एकच खोड ठेवल्यास खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे काही वेळा संपूर्ण झाड जाण्याचा धोका असतो. यासाठी सुरवातीच्या वाढीच्या काळातच चार ते पाच खोडे विकसित होऊ द्यावीत आणि यावरील जमिनीपासून दोन ते अडीच फुटापर्यंतचे फुटवे येऊ देऊ नयेत. आवश्‍यकतेनुसार झाडास आधार दिल्यास झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी रासायनिक व सेंद्रिय खतांचा नियमित पुरवठा करणे आवश्‍यक आहे. पहिल्या एक ते दोन वर्षांच्या कालावधीत खतांच्या मात्रा दर महिन्यास पिकाच्या वाढीनुसार विभागून दिल्यास झाडाची वाढ जोमाने होते. पुढील टप्प्यात गरजेनुसार रासायनिक खतांची मात्रा वाढवीत न्यावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे चांगल्या उत्पादनासाठी नियमित पाणीपुरवठा करणे आवश्‍यक आहे. सिंचनाचे पाणी त्या ठिकाणच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन ठिबक पद्धतीनेच द्यावे. www.agriplaza.in

Monday, June 11, 2012

वाढली पाहिजे शेतकऱ्याची पत


शेतीतले सर्व खर्च भरमसाट वाढत असतानाच त्यात भर पडतेय दुर्लक्ष होत जाणाऱ्या मनुष्यबळाची! पंजाब असो वा महाराष्ट्र, मजूर मिळत नाही आणि स्वतःला कामे होत नाहीत म्हणून शेती बटाईने देणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यंदाच्या पाडव्याला मराठवाड्यात चाळीस ते साठ हजार रुपये वर्षाला देऊनही सालगडी मिळणे अवघड झाले होते. रोजी दोनशे रुपये मिळूनही मजूर शेतावर येण्यास तयार नाही. त्यापेक्षा कमी रोजी मिळूनदेखील कुरिअर सेवा, चहाची टपरी, वडापावचा गाडा या कामांना पसंती दिली जाते. याचे कारण एकमेव आहे. शेतावर काम करण्याला प्रतिष्ठाच नाही, हा संदेश खोलवर गेला आहे. त्याचा फटका सध्या शेतीला बसत आहे. शेतीकामासाठी मजुरी वाढत चालली आहे, एकंदर उत्पन्नाच्या पन्नास टक्के वाटा मजुरीसाठी जात आहे, मजूर माजले आहेत, असा सूर यातून अजिबात आळवायचा नाही. श्रमासाठी त्यांना तेवढा मोबदला आवश्‍यकच आहे; परंतु या प्रक्रियेत उत्पादन खर्चात भरमसाट वाढ होत आहे. 
शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होण्यास खत व कीडनाशके वापरण्याची पद्धत देखील कारणीभूत आहे. आपली हरित क्रांती ही केवळ उत्पादनवाढीपुरतीच राहिली. त्याकाळी विज्ञान प्रसारकांनी काटेकोरपणा शिकवला नाही. पुढे शेती प्रशिक्षण व प्रसार कार्यक्रमच गुंडाळला गेला. शेती व्यवहार हा पूर्णपणे व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेला. बियाणे, खते, कीडनाशके यांचा वापर किती करावा, याचा सल्ला विक्रेता देतो (डॉक्‍टरची फी परवडत नाही, खोकला - सर्दीचा खर्च पाचशेपर्यंत जातो, त्यापेक्षा विक्रेत्याच्या सल्ल्याने औषध घेणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे, त्याच पद्धतीने). कित्येक गावांमध्ये विक्रेता हाच सावकारसुद्धा असतो. तंत्रज्ञान व्यापाऱ्यांच्या तावडीत गेले आणि हकनाक बदनाम झाले. पाणी असो, खत वा कीडनाशक; या सगळ्यांच्या वापरात मोकाट पद्धत रूढ झाली. कुठेही, कितीही, कधीही अशी रीत झाली. नासाडीची पर्वा नाही. रासायनिक खत वापरण्याचीसुद्धा एक शास्त्रीय रीत आहे. प्रत्येक वनस्पतीच्या मुळांचं क्षेत्र (रूट झोन) भिन्न असतं. त्याची माहिती घेऊन व मातीची तपासणी करून खत घातल्यास उपयोग होतो, नाही तर खत वाया जातं. आपल्याकडे शेतीमध्ये ज्ञानाचा वापर अजिबात होत नाही. विक्रेता सांगतो तेवढी पोती खत ओतलं जातं, शिवाय शेजाऱ्यांपेक्षा जोमदार पीक यावं म्हणून आणखी मात्रा टाकली जाते. या खताच्या नासाडीला विज्ञान जबाबदार नाही. रासायनिक खताचा वापर वाढण्याचं दुसरं कारण खताचे उत्पादन व विक्रेते हे आहेत. त्यांचा खप कसा वाढेल याची गणितं त्यांना चोख माहीत असतात. गावात स्थानिक पुढाऱ्यांच्या मताला खूप महत्त्व असतं. त्या पुढाऱ्याला हाताशी धरून कंपन्या शेतकऱ्यांच्या गळ्यात रासायनिक खतं व कीडनाशकं मारतात. बिचाऱ्या शेतकऱ्यालाही वाटत राहतं, "नवीन खत घातलं की पीक जोमानं येईल आणि कीडनाशक फवारलं की कीड नाहीशी होईल.' या सर्व प्रकारांत अज्ञान व माहितीचा अभाव हे मूळ कारण आहे. परिणामी शेतातलं उत्पादन विशेष वाढत नाही, खत व कीडनाशकांवरील खर्च मात्र वाढत जातो. देशात दर एकरी खताची नासाडी किती होते याचा अंदाज घेण्यासाठी 2001 मध्ये राष्ट्रीय सर्वेक्षण करण्यात आलं. दर एकरी दहा हजार रुपयांची खतं वाया जातात, अशी धक्कादायक माहिती त्या राष्ट्रीय सर्वेक्षणातून मिळाली. भारतामध्ये दर हेक्‍टरी सुमारे एक हजार रुपयांचे कीडनाशक देखील वाया जाते. मोकाट शेतीचे पर्यावरणावर भीषण परिणाम झाले. देशातील तेरा कोटी हेक्‍टर जमीन (एकंदर तेहतीस कोटी हेक्‍टर जमिनीपैकी) खराब झाली आहे. वारा, अति पाणी, मीठफुटी या कारणांमुळे माती अशी अनमोल संपदा नष्ट होत आहे. मानवी शरीरावरील त्वचा सोलून काढल्यावर काय होईल? जखमा वाढतील, हेच शेतीबाबतही घडत आहे. मातीची धूप हे शेतीसमोरील भीषण संकट आहे. 

"मानसिक यातनांमधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे शारीरिक यातना,' हे कार्ल मार्क्‍स यांचं निदान भारतीय शेतकऱ्यांकरिता 300 वर्षे अबाधित सत्य राहिलं आहे. कितीही यातना झाल्या तरी शेती काही सोडता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आयुष्यालाच सोडचिठ्ठी देण्याचं ठरवलं. 

भारतामधील शेतकऱ्यांकरिता एकविसाव्या शतकाची पहाट हे भयंकर दुःस्वप्न ठरलं. 2002 ते 2007 या काळात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व पंजाब राज्यातील सुमारे 17,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केवळ 2006 या वर्षात शेती आतबट्ट्याची होऊन कर्ज फेडण्याची उमेद संपली. कुटुंबाला पोसण्यासाठीच्या यातना सोसण्याची क्षमता न उरल्याने महाराष्ट्रातील 4,453 शेतकऱ्यांनी मरण कवटाळले. या प्रत्यक्षातील आत्महत्या होत्या. असफल, अप्रत्यक्ष व होऊ घातलेल्या आत्महत्या गावागावांत दिसू लागल्या आहेत. प्रसारमाध्यमे ढिम्म होती. "द हिंदू' दैनिकाचे पत्रकार पालागुम्मी साईनाथ यांनी अनेक लेखांमधून शेतकऱ्यांची दैन्यावस्था लोकांपर्यंत पोचवली, त्यामुळे केंद्र व राज्य सरकार हादरून गेले. 

शेतकऱ्याची पत - 
भारताच्या स्वातंत्र्याची सत्तावन्न वर्षे उलटल्यानंतर 2004 मध्ये पहिला शेती आयोग स्थापला गेला. शेतीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने 2007 मध्ये शेती अहवाल सादर केला. वरच्यावर शेतजमिनीचा आकार आकसत आहे. 11 टक्के शेतकरी भूमिहीन आहेत. 40 टक्के शेतकऱ्यांना एक एकरपेक्षा कमी जमीन कसावी लागते. 34 टक्के शेतकऱ्यांकडे एक ते पाच एकर जमीन आहे. केवळ 12.6 टक्के शेतकरी पाच एकरपेक्षा अधिक जमीन बाळगून आहेत. सर्वेक्षणातील ही माहिती सांगून डॉ. स्वामिनाथन जमिनीची पुनर्रचना करण्याचे आवाहन करतात. "लागवडीखालील जमीन व जंगलांचा अकृषक कारणांकरिता उपयोग रोखला पाहिजे. विशेष आर्थिक क्षेत्र (स्पेशल इकॉनॉमिक झोन)पेक्षा विशेष कृषी क्षेत्र (स्पेशल ऍग्रिकल्चर झोन) अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यल्पभूधारक व भूमिहीनांना पडीक जमीन कसण्यास द्यावी. जंगलात राहणाऱ्या आदिवासींना वनसंपत्तीचा लाभ घेऊ द्यावा. जमिनीचा आकार, खरेदीचा उद्देश व खरेदीदार यांचे स्वरूप विचारात घेऊन शेतजमिनीच्या विक्रीवर नियंत्रण आणले जावे,' अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली आहे. 

बॅंकेत शेतकऱ्याला यत्किंचित पत नाही. सहज व माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध होत नाही. साहजिक सावकार हाच मार्ग उरतो. दरमहा तीन ते पाच टक्‍के म्हणजे दरसाल 36 ते 60 टक्के व्याजाने कर्ज घेणे भाग पडते. शेतीमध्ये तोटा भरून काढण्याकरिता कर्ज, चक्रवाढ व्याजाचा वक्र चक्रव्यूह, चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे थेट मृत्यू! हा अटळ रस्ता चुकवण्याकरिता डॉ. स्वामिनाथन यांनी काही उपाय सुचवले. शेतकऱ्यांना दरसाल चार टक्के सरळ व्याजाने सहज कर्ज उपलब्ध व्हावे, अल्प दरात देशभरात सर्व पिकांकरिता विमा योजना चालू करावी, कित्येक शेतकऱ्यांना आरोग्य उपचारासाठी कर्ज काढावे लागते. आरोग्य विमा योजना देशभर चालू करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी घेऊन प्रत्येक राज्याने शेती आयोग स्थापन करावेत. अवर्षण वा अतिवृष्टीनंतर तातडीने मार्गदर्शन करण्यासाठी आपत्तीप्रवण गावांतून सल्ला देणारी ज्ञान केंद्रे चालू करावीत. शेतीमधील उत्पादकता वाढवण्याकरिता उत्तम दर्जाचे संशोधन व पायाभूत सुविधा देणे गरजेचे आहे. 

"जागतिक पातळीवरील शेतीमालाच्या उत्पादकतेशी तुलना केल्यास भारत कमालीचा पिछाडीवर आहे, हे स्पष्ट जाणवते. इंडोनेशियासारखा देश दर हेक्‍टरी 6,622 किलो तांदूळ पिकवतो; आपण मात्र 2,500 किलोच्या आसपास घोटाळत आहोत. त्यात सुधारणा होण्यासाठी देशभर माती तपासणीनंतर योग्य खत उपलब्ध करून दिले पाहिजे,' अशा शिफारशी केल्या आहेत. शेतीमालाचा भाव ठरवणे ही सरकारने शेतकऱ्यांची चालवलेली क्रूर चेष्टा आहे. एकच भाव सरसकट लागू करता येत नाही. प्रत्येक ठिकाणची व प्रत्येक पिकाची मजुरी वेगळी असते. बैलजोडीचे, ट्रॅक्‍टरचे भाडे भिन्न असते, हे गृहीत धरून उत्पादन खर्च काढला पाहिजे. "उत्पादन खर्चावर किमान 50 टक्के नफा देऊन शेतीमाAgriculture Informationलाची आधारभूत किंमत ठरवावी,' अशी सूचना शेती आयोगाने केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो धूळखात पडून आहे. त्यावरून सरकारची आस्था साफ दिसते. विरोधी पक्ष सरकारला जाब विचारत नाहीत. संसदेत शेतीप्रश्‍नावर रणकंदन होताना दिसत नाही. 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120612/5546044929795757382.htm

संत्रा बागेत केले कपाशीचे पीक यशस्वी


अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई येथील एका शेतकऱ्याने नवीन संत्रा बागेत कापसाचे आंतरपीक घेऊन चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. फरदडसहित एकरी 35 क्विंटल उत्पादन त्यांनी घेतले. कापसाला दरही चांगला मिळाल्याने हे पीकही आर्थिकदृष्ट्या किफायतशीर ठरले आहे. 
प्रा. जितेंद्र दुर्गे,  प्रा. डॉ. विजेंद्र शिंदे 

बीटी कपाशीचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक शेतकरी विविध पद्धतीने प्रयोग करताना दिसत आहेत. 
यामध्ये काहीजण लागवडीचे अंतर बदलून पाहतात, तर काहीजण ठिबक सिंचन, तसेच खते, पीक संरक्षण, सूक्ष्म 
अन्नद्रव्ये, लाल्या विकृतीचे नियंत्रण यावर अधिक भर देऊन उत्पादनवाढ साधण्याचा प्रयत्न करतात. 

अमरावती - मोर्शी रोडवरील नेरपिंगळाई हे गाव तसे पाहिले तर पिंगळाई देवीचे मंदिर, तसेच भाजीपाला उत्पादनासाठी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. भाजीपाला पिकांसोबतच या भागात संत्रा, सोयाबीन, तसेच कपाशीचे पीकसुद्धा घेतले जाते. गावातील प्रगतिशील शेतकरी गोपाल दामोदर शार हे परिसरात कपाशीसोबतच सर्वच पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गेल्या 30 वर्षांपासून ते शेती करतात. बीटी कपाशी घेण्यापूर्वी ते कपाशीचे एकरी 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेत असत. आताही बीटी कपाशी घेऊ लागल्यापासून त्यांनी उत्पादन चांगले ठेवण्यात सातत्य ठेवले आहे. शार यांची एकूण जमीन सुमारे साडेपाच एकर आहे. त्यामध्ये ते कपाशीसोबत सोयाबीन, मिरची, कांदा, भुईमूग आदी पिके घेतात. पाण्यासाठी त्यांच्याकडे विहिरीची सोय आहे. ठिबक सिंचनाच्या ऐवजी त्यांनी स्प्रिंकलरची सोय केली आहे. सन 2009 मध्ये त्यांनी संत्रा बाग लावली. हे क्षेत्र सुमारे अडीच एकरांपर्यंत आहे. या नव्या बागेत सध्या उत्पादन घेण्यासाठी नगदी पिकाचा प्रयोग करण्याचे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे 5.5 × 1.5 फूट या लागवडीच्या अंतरानुसार बीटी कपाशीची आंतरपीक म्हणून लागवड केली. शार शक्‍यतो पूर्वहंगामी लावणीवर अधिक भर देतात. मागील वर्षाच्या खरिपात मेचा अखेरचा आठवडा ते जूनचा पहिला आठवडा या दरम्यान त्यांनी कपाशीचे नियोजन केले. लागवड कोरड्यात करून घेतली. दोन झाडांतील दीड फूट अंतरानुसार एका ठिकाणी एक बी डोबून घेतले. त्यानंतर स्प्रिंकलरच्या साहाय्याने शेत ओलावून घेतले व कपाशीची उगवण करून घेतली. 

उगवणीनंतर तीन - चार दिवसांनी स्प्रिंकलरच्या साहाय्याने हलके पाणी दिले. उगवण झाल्यानंतर रासायनिक खताचा पहिला डोस दिला. कपाशीचे पीक साधारणतः 30 दिवसांचे झाले असताना दोन ओळींच्या मधोमध गाळ पाडून घेतला व कपाशीचे पीक गादीवाफ्यावर करून घेतले. यामुळे दोन प्रकारचे फायदे झाले. पावसाच्या पाण्याचे मूलस्थानी संवर्धन शक्‍य झाले, तसेच पाटपाण्याच्या माध्यमातून ओलित करण्याची सोय झाली. तसेच, स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी नालीचा उपयोग करता आला व झाडांना इजा होण्याचा धोका कमी झाला. कपाशीचे पीक साधारणतः तीन - चार फूट उंचीचे झाल्यानंतर (लागवडीपासून साधारणतः 65 दिवसांनी) झाडांचे शेंडे खुडून घेतले. यामुळे फळफांद्यांच्या संख्येत वाढ झाली, तसेच दोन कांड्यांमधील अंतर कमी राखले गेले. झाडांचे बूड तसेच मुख्य खोड जाड झाले, त्यामुळे कपाशीचे झाड बोंडांचे वजन सहन करू शकले. फळफांद्यांची संख्या वाढल्यामुळे आपोआपच पात्या, फुलांच्या संख्येत वाढ शक्‍य झाली. फळफांद्या येण्याच्या अवस्थेला रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला. त्यानंतर कपाशीचे पीक पात्या-फुलांवर असताना रासायनिक खतांचा तिसरा डोस दिला. अशाप्रकारे रासायनिक खतांचे व्यवस्थापन करताना खतांची मात्रा तीन वेळा विभागून दिल्यामुळे पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये योग्य वेळी उपलब्ध झाली. त्यामुळे पिकाच्या जोमदार व बळकट वाढीसाठी फायदा झाला. कपाशी पिकाचे रस शोषण करणाऱ्या किडींपासून, तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्याकरिता कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाची वेळोवेळी फवारणी केली. त्याचबरोबर वाढनियंत्रक, सूक्ष्म अन्नद्रव्यांचाही वापर आवश्‍यकतेप्रमाणे केला. आंतरमशागतीकरिता निंदण, डवऱ्याचे फेर, तसेच तणनाशकाची फवारणी यांचाही योग्य समन्वय साधला. अशाप्रकारे पिकाच्या आवश्‍यकतेनुसार योग्य लागवड व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकरी क्षेत्रात सुरवातीच्या टप्प्यात व फरदड पिकाचे सुमारे सहा क्विंटल असे एकूण 35 क्विंटल उत्पादन, तर दोन एकरांतून सुमारे 70 क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. अलीकडील वर्षांत एकरी किमान 25 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शार यांनी केला आहे. कापसाला सुरवातीच्या टप्प्यात 4100 रुपये प्रति क्विंटल, तर त्यानंतर 3800 ते 3900 पर्यंत दर मिळाला. दोन एकर क्षेत्रातून सुमारे दोन लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. दोन एकरांकरिता उत्पादन खर्च सुमारे 59,400 रुपये आला. खर्च वजा जाता दोन एकरांतून सुमारे 2,20,600 रुपये निव्वळ नफा मिळविला. 

संत्रा पिकाला असलेला भाव पाहून हे पीक परवडेल असे शार यांना वाटते. त्यांच्या परिसरात सोयाबीन हे पीकही घेतले जाते. मात्र, या पिकाच्या तुलनेत कापसाला मिळत असलेला भाव, त्याचे उत्पादन यांचा विचार करता आर्थिकदृष्ट्या हे पीक फायदेशीर होत असल्याचा अनुभव शार यांना मिळाला आहे. यंदाही बीटी कपाशी घेणार असून, अधिक उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेवल्याचे त्यांनी सांगितले. 

शार यांना आलेला उत्पादन खर्च साधारणपणे असा - 
दोन एकरांकरिता जमा - खर्च (रुपये) 

- जमिनीची पूर्वमशागत - 3000/- 
- बियाणे - 1900 
- लागवड मजुरी - 1100 
रासायनिक खते - 9000 
निंदण (तीन वेळा) - 2400 Agriculture Information
डवरणी (चार वेळा) - 2000 
तणनाशक (मजुरीसहित) - 1200 
ओलित (नऊ वेळा) - 3000 
पीक संरक्षण (मजुरीसहित) - 7800 
फरदडसह वेचणी (नऊ वेचण्या) - 28000 
एकूण लागवड खर्च रु. 59,400 रु. 

कपाशीचे मिळालेले उत्पादन 70 क्विंटल 
मिळालेला दर प्रति क्विंटल - 4000 
मिळालेले उत्पन्न - 2,80,000 रु. 
निव्वळ नफा रु. 2,20,600 




ref. link : http://www.agrowon.com/Agrowon/20120612/4623058111462907262.htm

उत्पादनाचे लक्ष्य गाठून जयवंत झाले शेतीत यशवंत


सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील जयवंत मोरे यांनी पीक बदल करून त्यातून सोनेरी प्रगती साधली आहे. सोयाबीनऐवजी बटाटा, उसात कांदा, त्यानंतर कलिंगड वा ढोबळी मिरची आदी विविध पिकांच्या प्रयोगांतून मोरे यांनी प्रयोगशील वृत्ती जोपासली आहे. कष्टाला अभ्यास, नियोजनाची जोड देत मोरे यांनी बदलत्या शेतीचा वेध घेत व पीक उत्पादनाचे लक्ष्य ठेवीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. 

श्‍यामराव गावडे 

नोकरीच्या मागे लागलेली तरुणाई असे चित्र दिसणाऱ्या सध्याच्या काळात शेती क्षेत्र निवडून त्यात करिअर करणे विशेष बाब आहे. रेठरे हरणाक्ष येथील जयवंत मोरे यांनी इचलकरंजी येथून टेक्‍स्टाईल इंजिनिअरची पदवी घेतली. चांगल्या पगाराची नोकरी मिळाली असती. परंतु घरच्या शेतीतच राबण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 

साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या एकरी शंभर टन ऊस उत्पादन योजनेत सहभागी होऊन त्यांनी उसाचे उत्पादन वाढवले आहे. त्यातून एकरी सरासरी 40 टन उत्पादन त्यांनी 75, 80, 90 अशा टप्प्याने दहा वर्षांच्या प्रयत्नांतून शंभर टनांवर नेले. उत्पादन वाढवताना जमिनीचा पोत चांगला राहावा व आर्थिक उत्पन्नही वाढावे यासाठी पीक पद्धतीत त्यांनी सतत बदल केला. 

...असा करतात पीकबदल 
मोरे पूर्वहंगामी उसाची (को-86032, फुले-265) लागवड करतात. त्याआधी ताग, धैंचा ही हिरवळीची पिके घेतात. गेल्या वर्षी त्यांनी सोयाबीनसाठी शेत तयार केले. मात्र सोयाबीनच्या दराचा विचार केला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी-पुणे) येथील माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोयाबीनच्या ऐवजी बटाटा लागवडीचा निर्धार केला. बटाटा हे पीक या भागात प्रथमच केले जाणार होते. निमसोड येथून खासगी कंपनीकडून बियाणे खरेदी केले. कंपनीच्या नियमानुसार करारपत्र भरून दिले. त्यामध्ये उत्पादित केलेला बटाटा प्रति किलो दहा रुपये दराने कंपनी विकत घेणार होती. (बाजारात त्या वेळी सात ते आठ रुपये दर बटाट्याला होता) बटाटा लागवड करताना साडेचार फुटाची सरी सोडून गादीवाफे तयार केले. त्यावर सहा इंच अंतरावर बेणेप्रक्रिया करून बटाटा टोकला. या शेतात आधी सबसरफेस पद्धतीचे ठिबक केले होते. बटाट्यासाठी बेसल डोस म्हणून 10-26-26 च्या तीन बॅग, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खत पाच बॅगा यांचा वापर केला. ठिबक सिंचनातून 12:61:0, 0:52:34, 0:0:50 ही खते गरजेप्रमाणे दिली. चांगल्या वातावरणामुळे बटाट्याचे पीक चांगले फोफावले. बटाटा पिकात करपा रोगाचा मुख्य प्रादुर्भाव असतो. त्याच्या नियंत्रणासाठी अधिक भर दिला. बटाटा पीक परिसरात प्रथमच असल्याने त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. बटाटा काढणीयोग्य झाल्यानंतर बैलांच्या अवजाराने काढणी केली. एकरी सुमारे आठ टन उत्पादन झाले. कंपनी कराराप्रमाणे 10 रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. त्यावर प्रति किलो अडीच रुपये बोनस मिळाला. सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न सुमारे 80 दिवसांत मिळाले. खर्च वजा जाता 59 हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या बटाट्यावर कंपनी प्रक्रिया करून चीप्ससारखे उत्पादन तयार करते. बटाट्याच्या तुलनेत सोयाबीन खर्च एकूण 13,100 रुपयांपर्यंत येतो. प्रति एकर सरासरी 12 क्विंटल उत्पादन मिळते. गेल्या तीन वर्षांमधील दर पाहिला तर तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आहे. उत्पन्न 24 हजार रुपये धरल्यास खर्च वजा जाता 11,900 रुपये इतके उत्पन्न मिळते. त्या तुलनेत बटाट्याचे आंतरपीक फायदेशीर ठरल्याचे मोरे यांनी सांगितले. 

ऊस व कांद्याचे आंतरपीक मोरे यांनी त्यानंतर उसात कांदा ही आंतरपीक पद्धती वापरली. बटाटा पिकानंतर उसाची रोपवाटिका केली. एक डोळ्याच्या उसाची रोपे लावली. बटाट्याच्या जागी गादीवाफ्यावर कांदा लावला. आंतरपीक कांद्याचे पाच एकरात 35 टन उत्पादन मिळाले. सहा ते आठ रुपये किलोला दर मिळाला. ऊस लागवडीचा बहुतांश खर्च त्यातून निघाला. पिकाचे उर्वरित अवशेष उसाच्या मुळाशी बुजवून टाकले. त्याचा उसाला चांगला फायदा झाला. 

यांत्रिकीकरण व ठिबक मोरे यांनी काळाची गरज ओळखून 40 एकर शेतीवर पूर्णपणे ठिबक केले आहे. त्यातील 15 एकर क्षेत्रावर सबसरफेस पद्धतीचे ठिबक आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देताना पालाकुट्टी करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याचबरोबर खोडकी तासणे, बगला फोडणे आदी कामे करणारे यंत्र त्यांच्या भावाने विकसित केले आहे. त्याच्या साहाय्याने कामे केली जातात. 

पीक पद्धतीतील बदल ठरला महत्त्वाचा मोरे यांनी सतत नवनवीन पिके घेण्याचा प्रयोग केला. त्यातून पूर्वी हळद, आले घेतले. खोडवा गेल्यानंतर नगदी पिके करण्याचे त्यांचे नियोजन असते. थोडक्‍यात, ही पिके बोनस म्हणून घेतात. त्यांनी अशाच पद्धतीने तीन एकरात कलिंगड घेतले. त्यातून एकरी किमान 20 टन उत्पादन घेतले. सध्या पावणेतीन एकरावर ढोबळी मिरची आहे. अडीच एकरात दीडशे टन उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 15 टन विक्री झाली असून किलोला 22 रुपये दर मिळत आहे. कोलकत्याचे व्यापारी जागेवरून माल नेत आहेत. पुणे, सातारा, मुंबई या ठिकाणी मालाची विक्री केली. मॉलसाठीही मालाला मागणी आहे. उन्हाळ्यात मिरचीचे पीक सुकून जाऊ नये म्हणून साडीचे शेड उभारून त्यात मिरची जगवली. ऐनवेळचा गरजेनुसार घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरला. अन्य शेतकऱ्यांचे प्लॉट वाळून गेले तेथे मोरे यांचा प्लॉट चांगल्या अवस्थेत होता. 

मोरे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
* चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळले. 
* गेली दहा वर्षे पालाकुट्टी व पाचट कुजवून त्याचा शेतात वापर करतात. 
* संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचनाने पाणी देतात. 
* यांत्रिकीकरणावर भर. गरजेनुसार विविध यंत्रे भावाच्या साह्याने बनवली. 
* एकरी शंभर टन ऊस उत्पादनासाठी नेहमी धडपड. त्यात यशही मिळाले. 
खोडव्याचेही एकरी 70 ते 80 टनांपर्यंत उत्पादन 
- नेहमी शिकण्याची वृत्ती. शास्त्रज्ञांचे सतत मार्गदर्शन घेतात. 
- पिकांचा सविस्तर अभ्यास करून दर्जेदार, कमाल आणि लक्ष्य ठरवून उत्पादनाचे प्रयत्न 
- परिसरात जी पिके होत नाहीत ती घेण्यावर अधिक भर 
परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक झाले आहेत. कृषी मंडळाची स्थापना. 


Ref. Link : http://www.agrowon.com/Agrowon/20120611/5578082911636012112.htmAgriculture Information

Friday, June 8, 2012

आम्ल वर्षा

खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूच्या दगडाचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. असा पाऊस म्हणजेच आम्ल वर्षा किंवा ऍसिड रेन होय. उत्तम सहाणे 


आम्ल वर्षा ज्याला इंग्रजीमध्ये ऍसिड रेन म्हणतात. असा पाऊस आपण कदाचित अनुभवला नसेल तरी या पावसाबद्दल नक्कीच ऐकले असेल. हा ऍसिड रेन काय आहे ते आपण थोडक्‍यात जाणून घेऊ या. पावसाच्या पाण्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो. या पावसाच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड (Co2) अमोनिया (NH3) आणि NH4 असतो. तसेच अल्प प्रमाणात धनभारीत आयर्न (Cations) (Ca++, Mg++. K+, Na+) आणि ऋणभारीत आयर्न (Anaions) (Cl2,- SO1-) असतात. शुद्ध पाण्याचा सामू 7.0 असतो. पडणाऱ्या पावसाचे पाणी ज्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो त्याचा सामू 5.6 इतकाच असतो. याचाच अर्थ पावसाचे पाणी हे आम्लधर्मी आहे. जेव्हा या पावसाच्या पाण्याचा सामू 5.6 पेक्षा कमी होतो. अशा पावसाला आपण आम्ल वर्षा किंवा "ऍसिड रेन' असे म्हणतो. 

प्रदूषणाचा परिणाम आम्ल वर्षा होण्यामागे प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक कारखाने आणि वाहने यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो. खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील पाण्याच्या किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ही दोन जहाल आम्ले तयार होतात. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडता. हीच आम्ल वर्षा किंवा ऍसिड रेन होय. 
जगात जो पाऊस पडतो त्यातील मोठ्या भागात या पाण्याचा सामू 4.0 ते 4.5 इतका आढळतो. हा सामू पाहिला तर तो शुद्ध पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामधील सामूच्या कितीतरी पटीने अधिक आम्लयुक्त आहे. आतापर्यंत आम्ल वर्षा झालेल्यांपैकी सर्वांत जास्त आम्लयुक्त पावसाचा सामू (स्क्वाटलंड सामू-2.4, पश्‍चिम व्हर्जिनिया सामू-1.5, लॉस एंजलिस सामू-1.7) हा व्हिनेगार (सामू-3.0) आणि लिंबाच्या रसापेक्षा (सामू-2.2) कमी आढळला आहे. म्हणजेच तो जास्त आम्लधर्मी आहे असे म्हणू शकतो. 

वनस्पतींवर होणारा परिणाम  
आतापर्यंतच्या काही संशोधनातील निष्कर्षामध्ये आढळून आले आहे, की जेव्हा कधी एखाद्या भागामध्ये आम्लाचा पाऊस पडतो त्यातील 70 टक्के भाग सल्फ्युरिक ऍसिडचा तर 30 टक्के भाग हा नायट्रिक ऍसिडचा असतो. या प्रयोगामध्ये इतरही काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत. आम्ल वर्षा ज्या भागात होते तेथील सूक्ष्मजीव, प्राणी, वनस्पती आणि नदी-नाल्यांमधील मासे यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 
एखाद्या पिकांवर किंवा वनस्पतीवर जेव्हा आम्ल वर्षा होते अशा वेळी विशेषतः झाडाच्या पानांवर लक्षणे दिसतात. यामध्ये पानांवर डाग पडणे, पाने करपून जाणे, पाने वेडीवाकडी होतात. काही वेळा पाना-फळांचे वजन कमी होते अशा प्रकारची काही लक्षणे दिसून आली आहेत. काही प्रयोगाअंती असे निदर्शनास आले आहे, की आम्ल वर्षा पडलेल्या ठिकाणी काही वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय चांगल्या संख्येने झाली तर उलटपक्षी इतर वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय कमी झाली. 

वनस्पतींवरील रोग आणि सूत्रकृमी यामध्येही पावसाच्या आम्लतेच्या तीव्रतेनुसार विविधता आढळून आली आहे. उदा. ओक वृक्षावरील तांबेरा रोगाचे प्रमाण हे साध्या पावसात पडणाऱ्या रोगांपेक्षा 14 टक्‍क्‍यांनी कमी झाले. वाल पिकाच्या मुळावरील सूत्रकृमींचे निरीक्षण केले असता आढळून आले की साधारण पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ज्या ठिकाणी 3.2 सामूची आम्ल वर्षा झाली अशा भागामधील वालाच्या मुळावरील सूत्रकृमीची अंडी सुमारे 34 टक्‍क्‍याने जास्त आढळली. 

अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रयोगांच्या निरीक्षणावरून आपण म्हणू शकतो की आम्ल वर्षा वनस्पती किंवा पिकांच्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असते. या विषयामध्ये नवीन संशोAgriculture Informationधन होणे खूप गरजेचे आहे. कारण सध्या हवामान बदलाचे परिणाम सर्वच थरावर जाणवायला लागले आहेत. या आम्ल वर्षाचा वेगवेगळ्या पिकांवर कशा प्रकारे आणि किती परिणाम होतो. तसेच उत्पन्नामध्ये कशी घट येणे, त्यावर काय उपाय करता येतील का अशा बऱ्याच प्रश्‍नांची उत्तर शोधण्याची गरज आहे. 

(माहिती स्रोत "ऍग्रोवायस न्यूज-लेटर' डिसेंबर 2010 )
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, हिल, ता. डहाणू, जि. ठाण येथे कार्यरत आहेत.)
 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120609/5530162041805349924.htm

Wednesday, June 6, 2012

Fwd: Google Alert - organic farming


News2 new results for organic farming
Farming workshop in city today
Times of India
NASHIK: The office of the divisional joint director, agriculture, Nashik division, has organised a one-day workshop on Tuesday on 'organic farming' for local farmers. The workshop which will be held from 10am to 5pm at Hotel Royal Heritage, ...
See all stories on this topic »
Consumer demand drives growth in organic farming
Register Pajaronian
Yet travel down Holohan Road or along Green Valley Road – or any major growing thoroughfare — and you will see signs reading "organic – don't spray," a testament to an evolving industry that is moving beyond conventional farming practices and ...
See all stories on this topic »

Web2 new results for organic farming
ORGANIC FARMING Ppt Presentation
topic covering the organic farming & its certification in india - A PowerPoint presentation.
www.authorstream.com/.../nitishranjanprakash-1427621-orga...
External study: "Use and efficiency of public support measures ...
European Commission - External study: Use and efficiency of public support measures addressing organic farming.
ec.europa.eu/agriculture/.../organic-farming-support_en.htm

Google Alert - agriculture technology


News7 new results for agriculture technology
Delegates from USA and Kenya visit PAU
Punjab Newsline
Apprising the delegation of transfer technology programmes, Dr Dhillon highlighted that the PAU is having excellent linkages with the farming community who utilize the expertise and the technical guidance of the university scientists from time to time.
See all stories on this topic »
Kickbacks in NABARD pilot project
IBNLive.com
Besides the NGOs, the project will be implemented with the help of Odisha University of Agriculture and Technology (OUAT) and State Agriculture department. While the sources at the Nabard office said the NGOs were selected in a meeting convened in this ...
See all stories on this topic »
Deal expected to boost crop insurance
BusinessWorld Online Edition
RIICE seeks to use satellite technology to gather information on agricultural production for the development of crop insurance policies to enhance income security of small farmers. The program is in different stages of implementation in India, ...
See all stories on this topic »
Pacts signed between India and Myanmar
The Hindu
Memorandum of Understanding on Establishment of Rice Bio Park at the Department of Agricultural Research in Nay Pyi Taw. — Memorandum of Understanding towards setting up of Myanmar Institute of Information Technology. — Memorandum of Understanding on ...
See all stories on this topic »
Mercury may drop in coastal Odisha
IBNLive.com
S Pasupalak, head of Agricultural Meteorology Department of Orissa University of Agriculture and Technology, the hot westerly wind from north-west blowing through Madhya Pradesh to Odisha and then over to Bay of Bengal will continue, but may remain ...
See all stories on this topic »
Fruitfulness despite inhospitable farmland
The National
Kunal Wadhwani is a co-founder of Agricel, a Dubai-based firm that has acquired global rights for a "soil-less" farming technology. He discusses plans for Agricel amid talks with private players who may want to market this technology across the Middle ...
See all stories on this topic »

The National
India-Myanmar Joint Statement
NetIndian
The Joint Working Group has identified some priority areas for future cooperation in the fields of agricultural biotechnology, post harvest technology, medical biotechnology, medical research and renewable energy. The two leaders welcomed these ...
See all stories on this topic »

NetIndian

Web5 new results for agriculture technology
African Agricultural Technology Foundation Signs License ...
As part of its Nitrogen Use Efficient Water Use Efficient and Salt Tolerant ( NEWEST) Rice Project, the Kenya-based African Agricultural Technology Foundation ...
www.merid.org/en/Content/News_Services/.../a.aspx
G.B.Pant University of Agriculture & Technology - Senior Research ...
Jobs Details :- Application are invited for the Posts of Senior Research Fellow in G. B.Pant University of Agriculture & Technology. 1-Post Name : Project ...
www.babunaukri.com/.../g-b-pant-university-of-agriculture-te...
G. B.Pant University of Agriculture & Technology jobs | Project Asst ...
G. B.Pant University of Agriculture & Technology, inviting application for the post of Project Asst www.freshersworld.com. Project entitled: Chitosan/Copper ...
jobs.freshersworld.com/detail/2012/05/23/.../Project-Asst
G. B.Pant University of Agriculture & Technology | SRF | Uttaranchal ...
G. B.Pant University of Agriculture & Technology, inviting application for the post of SRF www.freshersworld.com. Project entitled "Bio-efficacy studies of ...
www.freshersworld.com/jobs/detail/2012/05/23/G.../SRF
Tech taking over farming | Local Agriculture | Yorkton This Week ...
There is something interesting taking place in farming that most people not directly involved in the industry probably appreciate, and that is the increasing use of ...
www.yorktonthisweek.com/.../-1/.../tech-taking-over-farming

Google Alert - agriculture technology


News9 new results for agriculture technology
SCIENCE & TECHNOLOGY
Chandigarh Tribune
... Hertfordshire, is a threat to agriculture because pollen from the GM wheat could contaminate non-GM plants outside the trial boundary, and they believe GM is in general a dangerous and inappropriate technology for agriculture.
See all stories on this topic »

Chandigarh Tribune
AG Leaders Highlight Importance Of Water For Global Food Security
MarketWatch (press release)
Panel members discussed water as one of the most valuable resources in agricultural production, and how investments in research and new technologies are critical to better manage this increasingly limited resource. Below includes several insights from ...
See all stories on this topic »
Demographic shift endangers farming
Bangkok Post
These include diseases that can be minimised via use of new technology. The government should also help primary producers add value to their agricultural products. "People who sell fresh coconuts can be encouraged to use the coconut water to make some ...
See all stories on this topic »
RR manipulation suspected
E-Pao.net
Under SAMETI, Agricultural Technology Management Agencies (ATMA) have been opened and operating in all districts. Funds necessary for running ATMAs are released directly to SAMETI by the Government of India. Whatever amount released to SAMETI cannot be ...
See all stories on this topic »
Aqua farming hub
Oman Daily Observer
The Sultanate organised an international conference on aquaculture investment opportunities in Oman. the role of the Ministry of Agriculture and Fisheries in managing and developing the sector, opportunities and the latest technologies used in fish ...
See all stories on this topic »
State gets Rs 217 cr to bridge yield gap
IBNLive.com
Essentially, the objective is to increase the crop productivity by intensive cultivation through promotion of recommended agriculture technologies and package of practices. The State Government has planned to take up demonstration of paddy cultivation ...
See all stories on this topic »
'Tweaked' tomatoes could be 'juicier and tastier'
Zee News
Dani Zamir of the Robert H. Smith Faculty of Agriculture, Food and Environment of the Hebrew University. Other scientists involved in the project are from Argentina, Belgium, China, France, Germany, India, Italy, Japan, South Korea, Spain, ...
See all stories on this topic »

Zee News
FARA within the new alliance to boost Africa's food and nutrition security
StarAfrica.com
Particularly welcome is the G8's commitment to launch a technology platform together with FARA, the Consultative Group on International Agricultural Research (CGIAR), and other partners. FARA also recognises partnership with the private sector as a ...
See all stories on this topic »
Hemisphere GPS enhances AgJunction with weather data
Delta Farm Press
Hemisphere GPS has announced new weather features available in AgJunction, its precision agriculture data services platform. Through the advanced weather data service of Weather Decision Technologies, Inc. (WDT), AgJunction customers have more insight ...
See all stories on this topic »

Web1 new result for agriculture technology
Hydroponics, Aquaponics & Aeroponics farming technologies
Kenya's forest cover has progressively reduced from 10% at independence in 1963 to less than 3% presently. This situation is a result of massive deforestation, ...
yagrein.blogspot.com/.../hydroponics-aquaponics-aeroponics....