Friday, January 13, 2012

आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात,

आल्यापासून सुंठनिर्मिती कशी करतात, याबाबत मार्गदर्शन करावे. 
विजय तांबे, मु. पो. कुंभारी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद 

भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात. सुंठ तयार करावयास वापरावयाच्या आले पिकाची काढणी परिपक्व झाल्यानंतर करावी. ते पूर्ण वाढलेले, निरोगी असावे. सुंठीसाठी वापरायचे आले अधिक तंतुमय असू नये. रिओडी जानेरो, माहीम यांसारख्या कमी तंतुमय असणाऱ्या जातींचा वापर करावा. यापासून उत्तम प्रतीची सुंठ तयार होऊन चांगला बाजारभाव मिळतो. 

सुंठ तयार करण्याच्या पद्धती ः 
1) मलबार पद्धती ः या पद्धतीत आले स्वच्छ निवडून आठ-दहा तास पाण्यात भिजत ठेवतात. त्यानंतर त्याची साल काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा-सात तास भिजत ठेवतात. त्यानंतर द्रावणातून काढून हे आले छोट्याशा व बंद खोलीत पसरून ठेवतात. बंद खोलीत आल्याच्या कंदाला 12 तास गंधकाची धुरी देतात. थोडक्‍यात, बंद खोलीत गंधक जळत ठेवतात. त्यानंतर कंद बाहेर काढून दोन टक्के चुन्याच्या द्रावणात सहा तास भिजत ठेवतात व परत 12 तास गंधकाची धुरी देतात. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी लागते, त्यामुळे आल्याच्या कंदांस पांढराशुभ्र रंग येतो. हे प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशामध्ये वाळवले जाते व गोणपाटामध्ये घालून स्वच्छ केले जाते. हेच आले सुंठ म्हणून बाजारात पाठविले जाते. 

2) सोडा व खास मिश्रण पद्धती ः या पद्धतीने सुंठ तयार करण्यासाठी आले सर्वप्रथम स्वच्छ निवडून घ्यावे. त्यानंतर आठ ते दहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याची साल काढून घ्यावी. त्यानंतर दीड x दोन फूट आकाराच्या हाताने उचलेल इतक्‍या क्षमतेच्या गॅल्व्हनाइज्ड जाळीच्या पिंजऱ्यामध्ये आले भरून घ्यावे. तीन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये सोडिअम हायड्रॉक्‍साईड (कॉस्टिक सोडा)ची 20 टक्के, 25 टक्के आणि 50 टक्के तीव्रतेची द्रावणे तयार करून उकळून घ्यावीत. या द्रावणांमध्ये कंदाने भिजलेला पिंजरा 20 टक्के द्रावणामध्ये पाच मिनिटे, 

25 टक्के द्रावणामध्ये एक मिनीट आणि 50 टक्के द्रावणामध्ये अर्धा मिनीट धरावा. त्यानंतर पिंजऱ्यातील आले चार टक्के सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात दोन तास बुडवून ठेवावे. त्यानंतर चांगले निथळून स्वच्छ सूर्यप्रकाशात वाळत घालावे. चांगले वाळल्यानंतर थोडीफार राहिलेली साल चोळून काढावी. अशा पद्धतीने चांगली सुंठ तयार होते. प्रक्रिया करण्यापूर्वी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्‍यक आहे. 

संपर्क ः प्रा. हेमंत शिंदे, 9822615174 
भाजीपाला सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20111222/5544896947195005017.htm

नारळ लागवड आणि जातींची माहिती द्यावी.

नारळ लागवडीसाठी एक वर्षे वयाची रोपे लागवडीसाठी निवडावीत. रोपांचा बुंधा आखूड व जाड असावा. एक वर्षे वयाच्या रोपांना पाच ते सहा पाने असावीत. रोपे निरोगी व जोमदार असावीत. रोपे खात्रीशीर रोपवाटिकेतून खरेदी करावी. दोन झाडांमधील अंतर योग्य असणे गरजेचे आहे आणि ते जर नसेल तर नारळ उशिरा लागणे किंवा न लागणे यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. उंच वाढणाऱ्या नारळाच्या झाडाच्या पानाची लांबी 4.5 ते 5.5 मीटर असते. वजना मुळे पानाला धनुष्यासारख्या आकार येतो, त्यामुळे पानाचा देठ ते शेंड्यापर्यंत सरळ अंतर 3.25 ते 3.5 मीटर असते. म्हणून दोन माडा ंत 7.5 मीटर अंतर असेल तर नारळाच्या झावळ्या एकमेकांत शिरणार नाहीत किंवा एकमेकांना झाकणार नाहीत. माडापासून योग्य प्रमाणात उत्पन्न मिळण्यासाठी नवीन सलग लागवड करताना दोन ओळींत आणि दोन रोपांत 7.5 मीटर अंतर असणे गरजेचे आहे. परंतु पाटाच्या, शेताच्या किंवा कुंपणाच्या कडेने एका ओळीत नारळाची लागवड करावयाची असल्यास 6.75 किंवा सात मीटर अंतर ठेवले तरी चालेल. ठेंगू जातीसाठी सहा मीटर अंतर चालू शकते. 
जातींची माहिती 

उंच जाती 
1) वेस्ट कोस्ट टॉल (बाणवली) - भारताच्या पश्‍चिम किनाऱ्यावरील उ ंच जातीला वेस्ट कोस्ट टॉल म्हणतात. या जातीलाच कोकणात बाणवली या नावाने संबोधले जाते. या जातीचे आयुष्यमान 80 ते 100 वर्षे असून सहा ते सात वर्षांनी फुलोऱ्यात येते. पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सरासरी 80 ते 100 फळे मिळतात. 
2) लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा) - ही लक्षद्वीप बेटावरील नारळाची जात आहे. या जातीची झाडे आणि फळे बाणवलीसारखीच असतात, परंतु फळाच्या तीनही कडा उठावदार असतात, पूर्ण वाढलेल्या झाडापासून सरासरी 150 फळे मिळतात. या जातीच्या नारळात सरासरी 140 ते 180 ग्रॅम खोबरे मिळते, तर तेलाचे प्रमाण 72 टक्के असते. 
3) प्रताप - कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी येथे ही जात बाणवली वाणातून निवड पद्धतीने विकसित करून महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आली आहे. नारळाचा आकार मध्यम, गोल असून ती सहा ते सात वर्षांत फुलोऱ्यात येते. या जातीच्या एका झाडापासून 150 नारळ मिळतात. 
4) फिलिपिन्स ऑर्डिनरी - ही उंच प्रकारातील जात असून याची लागवड मोठ्या प्रमाणात फिलिपिन्स येथे केली जाते. या जातीचे नारळ आकाराने फारच मोठे असतात. एका नारळापासून सरासरी 213 ग्रॅम खोबरे मिळते, तर नारळाचे उत्पादन 94 ते 159 असून सरासरी 105 नारळ आहे. 
ब) ठेंगू जाती 
या जातीची झाडे उंचीने ठेंगू असतात आणि लवकर म्हणजे लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांनी फुलोऱ्यात येतात. ही जात सिंगापुरी या नावानेही ओळखली जाते, परंतु नारळामध्ये सिंगापुरी अशी जात नाही. ठेंगू जातीचे आयुष्यमान 30 ते 35 वर्षे असते. रंगावरून ऑरेंज डाफर्‌ , ग्रीन डार्फ आणि यलो डार्फ अशा पोटजाती आहेत. त्यातील ऑरेंज डार्फ ही जात शहाळ्यासाठी सर्वांत उत्तम असून तिच्या 100 मि.लि. पाण्यात सात ग्रॅम एवढे साखरेचे प्रमाण असते. 

क) संकरित जाती 
1) टी ु डी (केरासंकरा) - ही जात "वेस्ट कोस्ट टॉल' किंवा बाणवली आणि चौघाट ऑरेंज डार्फ यांच्या संकरातून तयार केली आहे. या जातीची झाडे चार ते पाच वर्षांत फुलोऱ्यात येतात. एका झाडापासून 100 ते 160 नारळ फळे, तर सरासरी 150 नारळ फळे मिळतात. खोबऱ्यात तेलाचे प्रमाण 68 टक्के इतके असते. 
2) टी ु डी (चंद्रसंकरा) - या संकरित जातीची फळधारणा चार ते पाच वर्षांनी होते. या जातीचे उत्पादन प्रति वर्षी 55 ते 158 फळे असते, तर सरासरी उत्पादन 116 फळे आहे. 
: 02352- 235331
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी



Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120102/5439768611959656204.htm

माती परीक्षण कसे करावे?

फळबाग लागवडीपूर्वी माती परीक्षणासाठी जमिनीचा रंग, खडकाळपणा, उंच-सखलपणा याप्रमाणे सारख्या गुणधर्मासाठी एक ते दोन हेक्‍टर क्षेत्राचे भाग पाडून त्याच्या मध्यभागी जास्तीत जास्त तीन फूट अथवा कठीण मुरूम अथवा खडकापर्यंत खड्डा घ्यावा. प्रत्येक एक फूट खोलीसाठी वेगळा नमुना घ्यावा. यासाठी एक फूट खड्डा पूर्ण झाल्यावर खड्ड्याच्या चार बाजूंची माती पाडून खड्ड्यामध्ये टाकावी. गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी. त्यातील अर्धा ते पाऊण किलो माती तपासणीसाठी घ्यावी. 

दुसऱ्या थरातील खोलीसाठी वरील एक फूट सोडून त्यापासून खाली एक फूट खोलीपर्यंत चार बाजूंनी माती खड्ड्यात पाडावी व चांगली एकत्र करून त्यातील अर्धा ते पाऊण किलो तपासणीसाठी घ्यावी. तिसऱ्या थरासाठी खड्ड्याच्या तळापर्यंत तीन फूट खोलीपर्यंत अथवा मुरूम लागला असेल त्या खोलीपर्यंतच्या थरातील माती चारी बाजूंनी खड्ड्यात पाडावी. त्यातील अर्धा किलो नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा. अशा प्रकारे नमुना तपासणीसाठी घ्यावा. 

- 02426 - 243861 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी


Ref.: http://www.agrowon.com/Agrowon/20120102/4922841066775574117.htm

जनावरांसाठी चारा नियोजन कसे करावे?

चारा पिकांचे सुधारित वाण 
पज्वारी - फुले, अमृता, रुचिरा, मालदांडी, एस.एस.जी. 59-3. 
पबाजरी - जायंट, बाजरा, राजको बाजरा. 
पमका - आफ्रिकन टॉल, मांजरी कम्पोझिट, विजय, गंगा सफेद 2. 
पओट - केन्ट, आर.ओ. 19 (फुले हरिता). 
पचवळी - श्‍वेता, ईसी 4216, बंदेल लोंबिया, यूपीसी 5286. 
पलसूणघास - आर.एल. 88, आनंद 2, आनंद 3, सिरसा 9. 
पबरसीम - वरदान, मेस्कावी, जेबी 1. 
पसंकरित नेपिअर - फुले जयवंत. 
पस्टॉयलो - हॅमटा, आर.एस. 95 
पमारवेल : मारवेल 7, मारवेल 8, मारवेल 40 


कृषी महाविद्यालय पुणे येथील तज्ज्ञ सोमनाथ माने यांनी दिलेली माहिती : जनावरांना चारा देताना एकदल चाऱ्याबरोबर द्विदल चारा पिका ंचा समावेश करणे फार गरजेचे आहे. वर्षभर हिरवा चारा मिळ विण्यासाठी हंगामानुसार पेरणी करणे गरजेचे आहे; परंतु खरीप हंगामात जास्त चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. खरीप हंगामात मका, ज्वारी, बाजरी, चवळी, स्टॉयलो, संकरित नेपिअर, मारवेल इत्यादी चारा पिकांची लागवड करावी. रब्बी हंगामात बरसीम, लसूणघास, मका व ओटची लागवड करावी. उन्हाळ्यात मका, ज्वारी, चवळी इत्यादींची लागवड करावी. एका पूर्ण वाढ झालेल्या गाईला 25 किलो एकदल व द्विदल चाऱ्याची व पाच किलो सुक्‍या चाऱ्याची गरज असते. हे लक्षात घेता दुभत्या गाईसाठी दहा गुंठे जमीन आवश्‍यक असते. शेतकऱ्याकडे पाच ते सहा दुभत्या गाई असतात, त्यानुसार 60 गुंठे क्षेत्रावर चारा पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. एका गाईसाठी वार्षिक चारा पिकाचे नियोजन करायचे असल्यास हिरवा चारा नऊ ते दहा टन व सुका चारा दोन ते अडीच टन आवश्‍यक आहे. त्यानुसार सहा गाईंसाठी 60 गुंठे जमीन आवश्‍यक आहे. त्यातून अंदाजे 55 ते 60 टन हिरवा चारा व 20 ते 25 टन सुका चारा जनावरांना उपलब्ध होऊ शकेल. 

कोरड्या चाऱ्यासाठी ज्वारीचा वापर करावा किंवा मारवेल, संकरित ने पिअरसुद्धा योग्य प्रमाणात वाळवून घेऊ शकता. एकदल व द्विदल चारा कुट्टी करून एकत्र करून घ्यावी. संकरित नेपिअर बांधाच्या कडेने लागवड करून जास्त जमीन उपयोगात आणता येते. कोणताही चारा 50 टक्के फुलोऱ्यात असताना कापणी केल्यास जास्त अन्नघटक