Friday, June 8, 2012

आम्ल वर्षा

खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूच्या दगडाचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडतात. असा पाऊस म्हणजेच आम्ल वर्षा किंवा ऍसिड रेन होय. उत्तम सहाणे 


आम्ल वर्षा ज्याला इंग्रजीमध्ये ऍसिड रेन म्हणतात. असा पाऊस आपण कदाचित अनुभवला नसेल तरी या पावसाबद्दल नक्कीच ऐकले असेल. हा ऍसिड रेन काय आहे ते आपण थोडक्‍यात जाणून घेऊ या. पावसाच्या पाण्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो. या पावसाच्या पाण्यामध्ये काही प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्‍साईड (Co2) अमोनिया (NH3) आणि NH4 असतो. तसेच अल्प प्रमाणात धनभारीत आयर्न (Cations) (Ca++, Mg++. K+, Na+) आणि ऋणभारीत आयर्न (Anaions) (Cl2,- SO1-) असतात. शुद्ध पाण्याचा सामू 7.0 असतो. पडणाऱ्या पावसाचे पाणी ज्याला आपण शुद्ध पाणी म्हणतो त्याचा सामू 5.6 इतकाच असतो. याचाच अर्थ पावसाचे पाणी हे आम्लधर्मी आहे. जेव्हा या पावसाच्या पाण्याचा सामू 5.6 पेक्षा कमी होतो. अशा पावसाला आपण आम्ल वर्षा किंवा "ऍसिड रेन' असे म्हणतो. 

प्रदूषणाचा परिणाम आम्ल वर्षा होण्यामागे प्रदूषण हा महत्त्वाचा घटक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक कारखाने आणि वाहने यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होतो. खाणीमधील तेल, कोळसा, नैसर्गिक वायू इत्यादींच्या ज्वलनातून तसेच अशुद्ध सल्फाईड धातूचे शुद्धीकरण सुरू असते. अशावेळी खूप मोठ्या प्रमाणात सल्फर आणि नायट्रोजन ऑक्‍साईड वायू हवेमध्ये सोडला जातो. हे वायू जेव्हा वातावरणातील पाण्याच्या किंवा आर्द्रतेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेतून सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल ही दोन जहाल आम्ले तयार होतात. यानंतर ही आम्ले पावसाच्या रूपाने म्हणजे पाणी, बर्फ किंवा धुक्‍याच्या स्वरूपात जमिनीवर पडता. हीच आम्ल वर्षा किंवा ऍसिड रेन होय. 
जगात जो पाऊस पडतो त्यातील मोठ्या भागात या पाण्याचा सामू 4.0 ते 4.5 इतका आढळतो. हा सामू पाहिला तर तो शुद्ध पाऊस पडणाऱ्या क्षेत्रामधील सामूच्या कितीतरी पटीने अधिक आम्लयुक्त आहे. आतापर्यंत आम्ल वर्षा झालेल्यांपैकी सर्वांत जास्त आम्लयुक्त पावसाचा सामू (स्क्वाटलंड सामू-2.4, पश्‍चिम व्हर्जिनिया सामू-1.5, लॉस एंजलिस सामू-1.7) हा व्हिनेगार (सामू-3.0) आणि लिंबाच्या रसापेक्षा (सामू-2.2) कमी आढळला आहे. म्हणजेच तो जास्त आम्लधर्मी आहे असे म्हणू शकतो. 

वनस्पतींवर होणारा परिणाम  
आतापर्यंतच्या काही संशोधनातील निष्कर्षामध्ये आढळून आले आहे, की जेव्हा कधी एखाद्या भागामध्ये आम्लाचा पाऊस पडतो त्यातील 70 टक्के भाग सल्फ्युरिक ऍसिडचा तर 30 टक्के भाग हा नायट्रिक ऍसिडचा असतो. या प्रयोगामध्ये इतरही काही निरीक्षणे महत्त्वाची आहेत. आम्ल वर्षा ज्या भागात होते तेथील सूक्ष्मजीव, प्राणी, वनस्पती आणि नदी-नाल्यांमधील मासे यांच्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. 
एखाद्या पिकांवर किंवा वनस्पतीवर जेव्हा आम्ल वर्षा होते अशा वेळी विशेषतः झाडाच्या पानांवर लक्षणे दिसतात. यामध्ये पानांवर डाग पडणे, पाने करपून जाणे, पाने वेडीवाकडी होतात. काही वेळा पाना-फळांचे वजन कमी होते अशा प्रकारची काही लक्षणे दिसून आली आहेत. काही प्रयोगाअंती असे निदर्शनास आले आहे, की आम्ल वर्षा पडलेल्या ठिकाणी काही वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय चांगल्या संख्येने झाली तर उलटपक्षी इतर वनस्पतीच्या बियांची उगवण अतिशय कमी झाली. 

वनस्पतींवरील रोग आणि सूत्रकृमी यामध्येही पावसाच्या आम्लतेच्या तीव्रतेनुसार विविधता आढळून आली आहे. उदा. ओक वृक्षावरील तांबेरा रोगाचे प्रमाण हे साध्या पावसात पडणाऱ्या रोगांपेक्षा 14 टक्‍क्‍यांनी कमी झाले. वाल पिकाच्या मुळावरील सूत्रकृमींचे निरीक्षण केले असता आढळून आले की साधारण पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत ज्या ठिकाणी 3.2 सामूची आम्ल वर्षा झाली अशा भागामधील वालाच्या मुळावरील सूत्रकृमीची अंडी सुमारे 34 टक्‍क्‍याने जास्त आढळली. 

अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रयोगांच्या निरीक्षणावरून आपण म्हणू शकतो की आम्ल वर्षा वनस्पती किंवा पिकांच्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असते. या विषयामध्ये नवीन संशोAgriculture Informationधन होणे खूप गरजेचे आहे. कारण सध्या हवामान बदलाचे परिणाम सर्वच थरावर जाणवायला लागले आहेत. या आम्ल वर्षाचा वेगवेगळ्या पिकांवर कशा प्रकारे आणि किती परिणाम होतो. तसेच उत्पन्नामध्ये कशी घट येणे, त्यावर काय उपाय करता येतील का अशा बऱ्याच प्रश्‍नांची उत्तर शोधण्याची गरज आहे. 

(माहिती स्रोत "ऍग्रोवायस न्यूज-लेटर' डिसेंबर 2010 )
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, हिल, ता. डहाणू, जि. ठाण येथे कार्यरत आहेत.)
 


Ref. Link: http://www.agrowon.com/Agrowon/20120609/5530162041805349924.htm

Thursday, June 7, 2012

सुगंधाचा व्यवसाय जाणार दहा हजार कोटींवर

 देशातील पारंपरिक असलेला व सध्या आधुनिकतेचा साज ल्यालेला सुगंध व्यवसाय दरवर्षी 40 टक्‍क्‍यांनी वाढत आहे. हा व्यवसाय या दराने वाढत राहिल्यास ते 2015पर्यंत दहा हजार कोटी रुपयांवर जाईल, असा विश्‍वास असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम) या संघटनेने व्यक्त केला आहे. 

यासंदर्भात असोचेमने प्रसिद्ध केलेल्या 'डोमेस्टिक फ्रॅगनन्स इंडस्ट्री ः दि वे अहेड' या अहवालात सध्या हा व्यवसाय तीन हजार 700 कोटींचा असल्याचे नमूद केले आहे. या अहवालानुसार सुगंध व्यवसायात डिओड्रंट, अत्तरे व रोलऑन यांचा समावेश होतो. भारतीय डिओड्रंट व रोलऑन यांची बाजारपेठ सध्या एक हजार 800 कोटी रुपये असून त्यात दरवर्षी 55 टक्के वाढ होत आहे. त्याचवेळी अत्तराची बाजारपेठ सध्या एक हजार 500 कोटी रुपयांची असून त्यात दरवर्षी 30 टक्के वाढ होत आहे. रोलऑनची बाजारपेठ सध्या 400 कोटी रुपयांची आहे. यामध्ये अत्यंत कमी ब्रॅंड बाजारात असल्यामुळे रोलऑनच्या बाजारपेठेची वाढ धीम्या गतीने होत आहे. 

दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या शहरांतून सुगंधांना असणारी वाढती मागणी हे देशातील सुगंधाचा हा व्यवसाय वेगाने फोफावण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे केवळ महानगरांतून सुगंधांचे नानाविध प्रकार विकणाऱ्या कंपन्यांनी आपले लक्ष दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकांच्या शहरांवर केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. या क्षेत्रात 30 टक्के व्यवसाय हा असंघटित आहे. 
भारतीय सुगंध बाजारपेठेत 60 टक्के सुगंध हे पुरुषांसाठी आहेत असे आढळते. या गटात सतत नव्या सुगंधांची भर पडत असते. महागड्या सुगंधांचा व्यवसायही जोरात सुरू आहे. विशेषतः अशा सुगंधांना पुरुषांमध्ये अधिक मागणी असल्याचे हा अहवाल सांगतो. स्त्रियांसाठी तुलनेने कमी सुगंध बाजारात उपलब्ध असले तरी यामध्ये उत्तरोत्तर वाढ होताना दिसत आहे. युवा वर्गातील मुलामुलींकडूनही सुगंधांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. शहरांमध्ये 500 ते दोन हजार रुपये किमतीचे सुगंध ही पिढी विकत घेताना दिसते. यामध्ये डिओड्रंट व रोलऑनची संख्या अधिक आहे. विशेषत या दोन्ही प्रकारच्या सुगंधांची खरेदी मार्च ते सप्टेंबर या काळात अधिक होताना दिसते. Agriculture Information विशेषतः सागरी किनारपट्टीजवळच्या शहरांतून डिओड्रंटची विक्री जोरदार होते असेही निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.


Ref. Link: http://agrowon.com/Agrowon/20120522/5385183596195029522.htm

पाकिस्तानच्या बाजारपेठेत रावेरच्या केळीचा दबदबा

आखाती देशांतील केळी निर्यात अपयशी ठरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील केळीला आता पाकिस्तानची बाजारपेठ मिळाली आहे. येथील बाजारपेठेत रावेरच्या केळीने दबदबा निर्माण केला आहे. रावेर व यावल तालुक्‍यांतील किमान 25 ट्रक केळीला पाकिस्तानातील लाहोर, कराची व इस्लामाबाद येथे मागणी वाढली आहे. अतिरिक्त जादा भाव मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. निर्यात सुरू झाली असली, तरी या आंतरराष्ट्रीय व्यापारात अजूनही काही अडचणी आहेत. त्या दूर झाल्यास रोज किमान शंभर ते दोनशे ट्रक केळी पाकिस्तानातील बाजारपेठेत जाऊ शकतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 

या वर्षी पाकिस्तानमध्ये केळी उत्पादनाला फटका बसला आहे, त्यामुळे पश्‍चिम व उत्तर भारतातील केळीची मागणी पाकिस्तानातून होत आहे. सावदा येथील हितेंद्र नारंग यांची डी. के. ऍण्ड सन्स ही फर्म थेट पाकिस्तानला केळी पाठवीत आहे, तर सावदा व फैजपूर येथील आणखी किमान चार फर्म पाकिस्तानला अन्य व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने केळी निर्यात करीत आहेत. 1960 ते 70च्या काळात रावेर येथून देवनदास ऍण्ड पारूमल कं.तर्फे पाकिस्तानात केळी निर्यात होत होती. आता सुमारे 45 वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील केळी पाकिस्तानच्या बाजारपेठेत पोचली आहे. 

...अशी होते पॅकिंग पाकिस्तानातही दर्जेदार केळीला चांगली मागणी आहे. रावेर तालुक्‍यातील चिनावल, कुंभारखेडा; तर यावल तालुक्‍यातील न्हावी, भालोद, सांगवी आणि हिंगोणा या गावांतील केळी बाजारभावापेक्षा 250 ते 500 रुपये प्रति क्विंटल जास्त देऊन खरेदी केली जात आहेत. कापणीनंतर पूर्ण काळजी घेत फण्या करून, स्वच्छ धुऊन मग ती कागदी खोक्‍यात भरली जातात. एका खोक्‍यात 16 किलो केळी भरली जातात. भारतातून पाकिस्तानमध्ये तीन विविध मार्गांनी केळी निर्यात केली जाते. जळगाव जिल्ह्यातून मुंबईपर्यंत ट्रकने, तेथून जहाजातून वातानुकूलित कंटेनरमधून केळीची निर्यात होते. याचबरोबरीने अमृतसर जवळील वाघा बॉर्डर व श्रीनगरमार्गे ट्रकच्या माध्यमातून केळीची निर्यात होते. 

दक्षिण भारतातील केळीबाबत खबरदारी 
1960-70च्या दशकात जेव्हा केळी भारतातून पाकिस्तानात निर्यात होत होती, तेव्हा दक्षिण भारतातून विषाणूजन्य केळी पाठविली गेली होती. म्हणून आता पाठविण्यात आलेली केळी दक्षिण भारतातील नसल्याचे व केळी विषाणू रोगमुक्त असल्याचे प्रमाणपत्र येथील व्यापाऱ्यांना पाकिस्तानच्या शासनास द्यावे लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी विषाणू रोगमुक्त आहेत; मात्र तसे प्रमाणपत्र कोण देणार, अशी अडचण व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. सध्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ही केळी दक्षिण भारतातील नसल्याचे व जळगाव जिल्ह्यातील असल्याचे प्रमाणपत्र व्यापारी घेत आहेत. राज्य शासन, कृषी विभाग, महा बनाना किंवा दक्षिण भारतीय केळी उत्पादक महासंघ यापैकी कोणीही पुढाकार घेऊन विषाणूमुक्त केळीचे प्रमाणपत्र मिळवून दिले, तर येथील केळीला पाकिस्तानात आणखी मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. या कामी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. सध्या सावदा व फैजपूर येथील भरत सुपे, तोलाराम कुंदनदास, जय मातादी फ्रूट कंपनी, भगवानदास लक्ष्मणदास ऍण्ड कं. व बऱ्हाणपूर मधील एक फर्म अन्य व्यापाऱ्यांच्या मदतीने केळी निर्यात करीत आहे. 

शेतकऱ्यांचा फायदा 
केळी पाकिस्तानला पाठविणारे सावदा येथील व्यापारी हितेंद्र नारंग यांनी सांगितले, की या निर्यातीत जादा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा आहे; तसेच या निर्यातीमुळे सुमारे सहाशे ते सातशे मजुरांना काम मिळाले आहे. आपल्याकडे सध्या 22 कंटेनर केळीची मागणी पाकिस्तानातून आहे. मात्र, वातानुकूलित कंटेनर उपलब्ध नसल्याने निर्यातीत अडचण येत आहे. 


Ref. Link: http://agrowon.com/Agrowon/20120606/5567840243232648437.htmAgriculture Information

Wednesday, June 6, 2012

Fwd: Google Alert - organic farming


News2 new results for organic farming
Farming workshop in city today
Times of India
NASHIK: The office of the divisional joint director, agriculture, Nashik division, has organised a one-day workshop on Tuesday on 'organic farming' for local farmers. The workshop which will be held from 10am to 5pm at Hotel Royal Heritage, ...
See all stories on this topic »
Consumer demand drives growth in organic farming
Register Pajaronian
Yet travel down Holohan Road or along Green Valley Road – or any major growing thoroughfare — and you will see signs reading "organic – don't spray," a testament to an evolving industry that is moving beyond conventional farming practices and ...
See all stories on this topic »

Web2 new results for organic farming
ORGANIC FARMING Ppt Presentation
topic covering the organic farming & its certification in india - A PowerPoint presentation.
www.authorstream.com/.../nitishranjanprakash-1427621-orga...
External study: "Use and efficiency of public support measures ...
European Commission - External study: Use and efficiency of public support measures addressing organic farming.
ec.europa.eu/agriculture/.../organic-farming-support_en.htm